Posts

Showing posts from August, 2011

ऋषीची भाजी

अहो असे दचकू नका! मी काही इथे ऋषीच्या भाजीची रेसिपी पोस्ट करत नाहीय. नुकताच ऋषीपंचमीचा लेख वाचनात आला आणि ऋषीच्या भाजीची आठवण झाली. तसं ऋषीची भाजी करणं येरागबाळ्याच काम नाही. जे करत असतील त्यांना नक्कीच पटेल. बर्याच जणांना कदाचित माहितही नसेल ऋषीची भाजी म्हणजे काय? ब्रम्हदेवाने जेव्हा सृष्टीची निर्मिती केली तेव्हा त्यांनी ७ ऋषी निर्माण केले वसिष्ठ, कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम आणि जमदग्नी. यांनाच सप्तर्षी म्हणून ओळखलं जात. यांच्यापासूनच पुढील पिढीची निर्मिती झाली. आपल्या घराण्याचे गोत्र सांगताना आपण ज्यांच नाव घेतो ते हेच आपल्या घराण्याचे मूळ पुरुष. ऋषीपंचमीच्या दिवशी याच ऋषींच स्मरण केलं जात. या दिवशी स्वकष्टाने निर्माण केलेलं म्हणजेच शेतीसाठी बैलांचा वापर न करता तयार झालेलं अन्न जसं कंदमूळ, रानपाला शिजवला जातो. त्यालाच ऋषीची भाजी असं म्हणतात. माझी ऋषीच्या भाजीशी ओळख झाली ती माझ्या आजीमुळे. भले घरी गणपती बसत नसले तरी ती भलं मोठं पातेलं भरून ऋषीची भाजी करायची. मग सगळ्या शेजाऱ्या-पाजाऱ्याना आणि आपल्या लेकींना ती भाजी पोहोचती करायची हा तीचा दरवर्षीचा परिपाठ असायचा. लहान...

ऋण गाण्याचे

काही वर्षांपूर्वी लोकसत्ताने एक निबंध स्पर्धा आयोजित केली होती. "ऋण गाण्याचे" हा निबंधाचा विषय होता. एखाद्या गाण्याने आपल्या आयुष्यात काहीतरी चांगला बदल झाला असेल तर त्या विषयीचा आपला अनुभव त्यात लिहायचा होता. विषय खरच खूप छान आणि वेगळा होता. मलाही माझा अनुभव त्यात मांडायचा होता पण काही कारणांमुळे (माझ्या आळशीपणामुळे) ते राहून गेलं. मी तेव्हा SSC ला होते. फारशी स्कॉलर नव्हते पण ७०/७२% पर्यंत नक्कीच मजल मारायची. अन त्यात क्लास-बीस ला जाणं मला आवडायचं नाही. स्वताचा अभ्यास स्वतः करायचा. Final exam चे दिवस जवळ आले होते अन इतर मुलांप्रमाणे माझीही धडधड वाढायला लागली होती. एक तर बोर्डाची exam त्यात स्वताची शाळा सोडून दुसरीकडे जाउन पेपर लिहायचं टेन्शन. आजूबाजूच्या लोकांनी काहीतरी मोठा भयंकर इवेंट असल्या सारखी केलेली वातावरण निर्मिती त्यामुळे सॉलिड टेन्शन आलं होतं. नशीब त्यातल्या त्यात शाळा(सेंटर) तरी जवळ आणि चांगली आली होती. शेवटी तो दिवस उगवला ज्या दिवशी माझा पहिला पेपर होता. रात्री तर झोप आलीच नाही. घरच्यांच्या आणि देवाच्या पाया पडून मी परीक्षेला निघाले. एकटी कसली जातेय? सह...

आरक्षित सीट

आरक्षण हा आपल्या देशातला किती कळीचा मुद्दा आहे हे मला हल्लीच BEST मधे आलेल्या अनुभवावरून कळल. तरी बरं BEST ने बरयापैकी सीट्स आरक्षित ठेवल्या आहेत महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि अपंगांसाठी. जर प्रत्येकजण आप आपली जबाबदारी समजुन वागला तर आरक्षणाची गरजच नव्हती. असो, तर त्यादिवशी बस नेहमी प्रमाणे बर्यापैकी भरली होती. बसायला जागा नव्हती आणि standing बरच होतं. एवढ्यात पुढच्या साइडला जिथे अपन्गांची सीट असते तेथून भांडणाचा आवाज यायला सुरुवात झाली. त्या अपन्गांच्या आरक्षित सीट वर एक ज्येष्ठ नागरिक, एक अपंग व्यक्ति बसले होते अन पुढल्या स्टॉप वर एक अंध व्यक्ति चढली. त्यावरून त्यांच्यात वाद सुरु झाला की त्या अंध व्यक्तीला बसायला द्यायला सीट वरून उठणार कोण? खरं पहायला गेलं तर जे स्वताला ज्येष्ठ नागरिक म्हणवत होते ते सदगृहस्थ बर्यापैकी हट्टे कट्टे होते आणि सहज उभे राहू शकत होते, निव्वळ त्यांच्याकडे ज्येष्ठ नागरिकत्वाच आयकार्ड होतं म्हणून त्याना तिथून उठायचं नव्हतं. शेवटी कोणीच तिथून उठलं नाही आणि बाजुच्या सीट वरच्या एका युवकाने त्या अंध व्यक्तीला बसायला जागा दिली. कोण बरोबर किव्वा कोण वाईट य...