Posts

Showing posts from November, 2011

कसं जगायचं?

आयुष्य जगणं हि एक कला आहे, कसं जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं.. दुख सगळ्यांनाच असतात, दुखाला हसत जगायचं कि दुखात पिचत जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं.. उद्याच्या चिंता सगळ्यांनाच असतात पण उद्याची शाश्वती कोणालाच नसते, उद्यासाठी आज मरायचं कि आजच्या दिवसात संपूर्ण आयुष्य जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं.. समाजात जर आपलं अस्तित्व टिकवायच असेल तर स्पर्धा अटळ आहे, पण हि स्पर्धा दुसर्याशी आहे कि स्वताची स्वताशी हे ज्याचं त्याने ठरवायचं.. समाज हा दुसर्याची निंदा करण्यासाठीच असतो, कोणासाठी जगायचं? स्वतासाठी कि समाजासाठी हे ज्याचं त्याने ठरवायचं.. आयुष्यात सुखाचेही चार क्षण येतात, टिचभर सुखात सुख मानायचं कि सुख वाटून वाढवायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं.. कोणाच्यातरी आदर्शांवर जगायचं कि स्वताचा आदर्श सोडून जायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं.. प्रत्तेक सामान्य माणसात काहीतरी असामान्य गोष्ट असतेच, सामान्य म्हणून जगायचं कि असामान्य म्हणून हे ज्याचं त्याने ठरवायचं.. प्रत्तेक दिवस एक संघर्ष आहे आणि जीवन एक लढाई जिंकून मरायचं कि हरत जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं जगण्यासाठ...

देवांचा बाजार!

आज सकाळी सकाळी mailbox मध्ये साईबाबा अवतरले होते. शिर्डी पाहिली नसल्यामुळे मोठ्या कुतूहलाने मी ते इमेल उघडलं. छे!!!!! साईबाबा होते कुठे त्यात? सोन्या-चांदीचं प्रदर्शन होतं ते. अन त्या प्रदर्शनात केविलवाणी दिसणारी ती उत्सवमूर्ती जीला करोडो रुपयांचे सोन्याचे हार घातले होते. ज्या साईबाबांनी आपले जीवन लोकांच्या सेवेसाठी वेचले जे कायम फकिरासारखे राहिले त्यांना सोन्या-चांदीच अप्रूप ते काय असणार? ते जर आज असते तर त्यांनी नक्कीच हे सगळं गरीब लोकांमध्ये वाटून टाकलं असतं. सोनं चांदी देणाऱ्या आणि घेणार्यांना साईबाबा अजून कळलेच नाही हे साईबाबांचं दुर्दैव! नाही का? आजकाल देवस्थान हि फक्त श्रद्धास्थान राहिली नसून पैसे कमवायची नवीन साधनं बनली आहेत. या मे मध्ये आम्ही गोव्याला शांतादुर्गाला गेलो होतो. आम्ही घरून साग्रसंगीत साडी चोळीची ओटी घेतली होती. तिथे गेल्यावर पुजार्याने सांगितलं ५ नारळाचं तोरण द्यावं लागेल त्याचे पैसे counter वर भरून या. मंदिरा पासून नारळाचे stalls खूप दूर होते हे जेव्हा आम्ही पुजार्याच्या निदर्शनास आणून दिले तेव्हा त्याने तिथे असलेले लोकांचे आलेले नारळ एकत्र करून ओटीचा कार्यक्...